Friday 5 June 2015

आठवणी १: कथा ११ ते १५ बद्दल

नमस्कार! आपल्या घरांत जे आस्तिक किंवा नास्तीकपणाचे वातावरण असतं, त्यांचप्रमणे त्या घरांतील मुलांची मने नकळत घडत असतात. मनस्विनी ज्या विचारांच्या कुटुंबात वाढली, त्याचप्रमाणे ती बनली. परिस्थितीनुसार तिचे विचार ही बदलत गेले. आत्म्याचं अस्तित्त्व ती विश्वासपूर्वक मानते. तरीही भक्तीच्या नावानं होणारं अवडंबर तिला आवडत नाही. ती 'त्या' शक्तीबद्दल कृतज्ञ आहे. बालवयात असणारी अंधश्रद्धा तिला समाज आल्यावर बदलते - ती practical होते. हा बदल कसा येतो, म्हणजेच 'अंधश्रद्धा' ही गोष्ट. तिच्या कुटुंबातील आत्या तिच्या वरील प्रेमापोटी रूढी मोडून, स्वत:च्या मनाची घडण दूर करून तिचा खुळा हट्ट पुरवते. या तिच्या कृतीचा उमटलेला ठसा नि त्याचा परिणाम मनस्विनीच्या 'डोक्यातला गजरा' प्रकरणात स्पष्ट दिसतो.

आपलं आयुष्य जगत असताना कधी कधी अचानक त्याला खीळ बसावी असं घडतं. सर्व प्रकारे विचार करूनही ते कसं का घडतं याचं उत्तर तिला मिळत नाही, तेव्हा 'योगायोग असेल का?' ह्या विचाराचा पगडा तिला शिवतो. एरवी नास्तिक असलेली मनस्विनी विश्वास अविश्वासाच्या border line वर दिसते.

'ज्ञानाचा उपयोग' ह्या गोष्टीत तिच्या घरातील मुलींची काळजीपूर्वक होणारी जोपासना जाणवते. घरातील शिस्त सांभाळताना, उच्च नैतिक मूल्ये राखताना तिच्या वडिलांची होणारी तारांबळ पहायला मिळते. स्त्री शिक्षण जरूर वाटणारे तिचे वडील तिला समाजात कसं वागावं, ह्याचे पाठ नकळत देत होते. तिच्या शिक्षणाला तिच्या घरातील स्त्रियाच अडथळे आणत असत, याचं आश्चर्य वाटतं! 'लेझीम स्पर्धा' या कथेत अशा परीस्थित, तिला मिळालेल्या दुर्मिळ शिक्षण संधीबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते. या स्पर्धेचं रसभरित वर्णन मात्र ठसकेबाज, कलात्मक, glamourous लेझीमचे प्रदर्शन, यथार्थ दिसते. वाचक त्या काळात जाउन, त्यांचे innovation, प्रसंगाचे thrill आणि विजयाचा गौरव अनुभवतो. आपणही वाचून बघा. 

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386
Manaswini's quote of the day: संधीचाच अवकाश!

No comments:

Post a Comment