Sunday 7 June 2015

आठवणी १: कथा २१ ते २५ बद्दल


नमस्कार! आठवण - १ मधील शेवटच्या पांच कथांबद्दल लिहिताना एक पूर्ततेचा आनंद वाटत आहे, घेतलेले व्रताचे उद्यापन होत आहे. नियमितपणे हे सर्व ब्लॉग्स लिहीताना त्यांत सुसूत्रता ठेवणं अगदी सोपं गेलं! वाचकांनो धन्यवाद!

मनस्विनीचे आई-वडील जरी शिवभक्त होते तरी बुद्धीची देवता गणपती यांनाही ते मानत असल्याने दर वर्षी येणाऱ्या गौरी गणपतीची भावपूर्वक पूजा करत असत. लहानपणापासून शिकण्याचे वेड असलेल्या मनस्विनीला या उत्सवाचे महत्त्व तिच्या लहानपणी जरी कळत नव्हते तरी वेदपठण, मंत्र जागर इ. संस्कृत तालबद्ध, लयबद्ध व त्रिपाठी मंत्रघोष आजही तिच्या मनावार पक्का ठसा ठेऊन आहेत. या उत्सवाची माहिती ती 'उत्सव श्री गणेशाचा' कथेत वर्णिते.

'माणूस एक जनावरच' ही कथा, समाज प्रतिष्ठीत असो किंवा रांगडा असो, चालतो एकाच मार्गानं. प्रतिष्ठेच्या नावाखाली छुपा तर रांगडेपणात उघड उघड agenda दिसतो! मनस्विनीच्या अनेकविध नोकऱ्यामध्ये तिलाही विविध प्रकारची माणसं भेटली. त्यांचे विविध रवैय्ये तिने जवळून पाहिले आहेत. पण मुळात धागा एकच - स्त्री, संपत्ती, अधिकाराचा दुरुपयोग! मनस्विनी स्वाभिमानी आहे. ती आपली जिद्द पूर्ण करताना नोकरीची गरज, नोकरीत तिच्याकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा ती निरीक्षणाने जाणते. पण नैतिकतेचा प्रचंड भक्कम पाया असल्यामुळे ती अत्यंत हुशारीनं वागते. अर्थात अतिसज्जन माणसं जशी corporate दुनियेत लांब ठेवली जातात किंवा बांधून ठेवली जातात, याचा अनुभव पूर्णपणे घेते. ही कथा म्हणजे 'सवलत मागणं एक प्रकारची भीकच!' तिच्या मनाची तळमळणारी, टोचणारी, जखमी अवस्था तिच्या लिखाणात यथार्थपणे उतरली आहे.

तिच्यासारखच अनेकांना अभ्यासाचं वेड असतं. हे वेड तिनं 'अभ्यास' कथेत रंगवलं आहे. पोटभरू शिक्षणाचा आणि व्यवहारी ज्ञानाचा अर्थार्थी संबंध नाही तरीही ज्ञान हे ज्ञान असून त्याने व्यक्तीचा विकासाच होतो. ते वाया जात नाही. म्हणून प्रत्येकानं जरूर शिकावं असं मनस्विनी मानते.

आज तिचे आयुष्य एक यशस्वी स्त्री म्हणण्या इतकं परिपूर्ण आहे. कुटुंबात, समाजात ती सर्वांना हवीशी वाटते पण या शतकातील कुटुंबे, जास्त करून मध्यम वर्गीय कुटुंबे, विखुरली आहेत. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, पैसा कमावण्यासाठी, स्वतःची तरक्की व्हावी म्हणून गरजेची झाली आहे. घर लहान पडतं, पैसे कमी पडतात, भावा भावांच्या कमाईतील तफावत, जबाबदारी टाळण्याची युक्ती, बायका बायकांतील चढाओढ - एक नाही, अनेक कारणं! पण याचा अर्थ त्यांच्यातील प्रेम भावना आटली आहे असे नाही. Skype, Facebook, मोबाईल, आय पॅड एक नाही अनेक मार्गांनी ती कुटुंबे जोडलेलीही आहेत. Thanks इंटरनेट दादा! दुरूनही एकमेकांची विचारपूस करतात, सुख दु:ख जाणून घेतात, अडचणीत मदत करतात. तरीही त्यांचा प्रत्यक्ष सहवास नाही. या सहवासाच्या अभावाने या आपुलकीत काहीतरी 'नक्कीच' कमी आहे. मनस्विनीच्या सर्व अनुभवाने, तिला आपण सोन्याच्या पिंजऱ्यात असल्यासारखं वाटतं. सर्व सुखसोयी, आनंद, प्रतिष्ठा जो मिळवता मिळवता माणूस जन्म घालवतो, तो मिळूनही ती 'ने मजसी ने' असे उद्गार काढते. कुठे ने? या पलिकडे की परत मायभूमीकडे - आपणच वाचून पहावे.

कुठल्याही चांगल्या गोष्टीचा आरंभ गणेश पूजेने करतात. आज या पुस्तकाचा शेवट. मग गणेश स्मरण मनस्विनीने का बरं केलं? हाच आठवणी - २ चा शुभारंभ समजावा! लवकरच आठवणींचा पुढील भाग घेऊन येईपर्यंत रामराम करते

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386
Manaswini's quote of the day: गणपती बाप्पा मोरया!  

Saturday 6 June 2015

आठवणी १: कथा १६ ते २० बद्दल


नमस्कार! चंदेरी नगरी मुंबई! चमचमत्या अत्याधुनिक नव नवीन गोष्टी! सर्वच बाबतीत अग्रेसर शहर! उत्तमातील उत्तम तसंच वाईटातील वाईट इथं सहज दृष्टीस पडतं. सामान्यांना मुंबईची लोकल कधीच चुकत नाही. चांगल्याचा वाईटाचा अनुभव इथेही येतो आणि त्याला तो तोंडही देतो. लोकलमधील भिकारीणीचा किस्सा, या शहरातील रीत कशी मानवी चांगुलपणाला आळा घालते, आणि संशायाचे भूत मनात बाळगून, लोकं सतत कसे सावध वावरतात हे या गोष्टीत छान दाखवले आहे. 'जग कशावर चालते' उत्तर सोपं नि साधं आहे, गरजवंताची गरज आणि पैशाची नड! मनस्विनी तिच्या आयुष्यातील अशा क्षणाचे वर्णन करते जे तिच्या स्वाभिमानी स्वभाव आणि परिस्थितीच्या आहारी न जाणे यांतील निवड करणरे आहे.

'रोजची' गोष्ट रोजचीच गोष्ट असून, समाजातील गद्दारीवर टीका आहे, अपंगत्वावर नव्हे. कशाचं ही भांडवल करून गद्दार लोकं आपला स्वार्थ साधतात. गडबड घोटाळे करूनही आपली ध्येयपूर्ती साधतात, अगदी कायदेशीर पणे!

'एका पिढीतील श्रीमंतीचा माज' या गोष्टीत मनस्विनी तिची नोकरी कशी गमावते ते पहा. ज्या कारणाने सर्व मुलींची सुट्टी केली जाते, त्याबद्दल कोणीच काही करू शकत नाही पण श्रीमंतीचा हा माज इतर गरिबांना कसा सोसावा लागतो आणि गंमत म्हणजे, ही परिस्थिती निर्माण करणारी व्यक्ती तिथेच आपले बस्तान कायम करते. जागोजागी हेच दिसतं…

प्रत्येक कर्तृत्ववान मणसाचा एक काळ (era) असतो. त्या काळाची शोभा, शान, वैभव त्याच्या काळापुरती झळकते परंतू त्याच्या पश्चात ते सारं लोप पावतं. 'आंब्याचे साम्राज्य' ही अशीच एका glorious past चे शब्दचित्र आहे. सर्व साधारणपणे येणारे हे अनुभव मनस्विनीने या पाच गोष्टीं द्वारे सांगितले आहेत, तिच्या अनोख्या शैलीत. वाचून अभिप्राय जरूर कळवा

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386
Manaswini's quote of the day: Beware! बनेल लोकं!

Friday 5 June 2015

आठवणी १: कथा ११ ते १५ बद्दल

नमस्कार! आपल्या घरांत जे आस्तिक किंवा नास्तीकपणाचे वातावरण असतं, त्यांचप्रमणे त्या घरांतील मुलांची मने नकळत घडत असतात. मनस्विनी ज्या विचारांच्या कुटुंबात वाढली, त्याचप्रमाणे ती बनली. परिस्थितीनुसार तिचे विचार ही बदलत गेले. आत्म्याचं अस्तित्त्व ती विश्वासपूर्वक मानते. तरीही भक्तीच्या नावानं होणारं अवडंबर तिला आवडत नाही. ती 'त्या' शक्तीबद्दल कृतज्ञ आहे. बालवयात असणारी अंधश्रद्धा तिला समाज आल्यावर बदलते - ती practical होते. हा बदल कसा येतो, म्हणजेच 'अंधश्रद्धा' ही गोष्ट. तिच्या कुटुंबातील आत्या तिच्या वरील प्रेमापोटी रूढी मोडून, स्वत:च्या मनाची घडण दूर करून तिचा खुळा हट्ट पुरवते. या तिच्या कृतीचा उमटलेला ठसा नि त्याचा परिणाम मनस्विनीच्या 'डोक्यातला गजरा' प्रकरणात स्पष्ट दिसतो.

आपलं आयुष्य जगत असताना कधी कधी अचानक त्याला खीळ बसावी असं घडतं. सर्व प्रकारे विचार करूनही ते कसं का घडतं याचं उत्तर तिला मिळत नाही, तेव्हा 'योगायोग असेल का?' ह्या विचाराचा पगडा तिला शिवतो. एरवी नास्तिक असलेली मनस्विनी विश्वास अविश्वासाच्या border line वर दिसते.

'ज्ञानाचा उपयोग' ह्या गोष्टीत तिच्या घरातील मुलींची काळजीपूर्वक होणारी जोपासना जाणवते. घरातील शिस्त सांभाळताना, उच्च नैतिक मूल्ये राखताना तिच्या वडिलांची होणारी तारांबळ पहायला मिळते. स्त्री शिक्षण जरूर वाटणारे तिचे वडील तिला समाजात कसं वागावं, ह्याचे पाठ नकळत देत होते. तिच्या शिक्षणाला तिच्या घरातील स्त्रियाच अडथळे आणत असत, याचं आश्चर्य वाटतं! 'लेझीम स्पर्धा' या कथेत अशा परीस्थित, तिला मिळालेल्या दुर्मिळ शिक्षण संधीबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते. या स्पर्धेचं रसभरित वर्णन मात्र ठसकेबाज, कलात्मक, glamourous लेझीमचे प्रदर्शन, यथार्थ दिसते. वाचक त्या काळात जाउन, त्यांचे innovation, प्रसंगाचे thrill आणि विजयाचा गौरव अनुभवतो. आपणही वाचून बघा. 

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386
Manaswini's quote of the day: संधीचाच अवकाश!

Thursday 4 June 2015

आठवणी १: कथा ६ ते १० बद्दल


नमस्कार! बालपणांत सहज सुलभ मिळणाऱ्या नैसर्गिक गोष्टींतून मनस्विनी आनंद घेत असे. त्यासाठी पैसे खर्चावे लागत नसत. त्यातून कितीतरी गोष्टी ती शिकली. 'बुचाची फुले' ही याचीच आठवण! बुचाची फुलं त्या काळातील वर्गातले किस्से, गंमत, सहकार्य दर्शवते. ती अतिशय जिद्दी आहे, हट्टी आहे पण सर्वांची लाडकी आहे. मनात ज्या गोष्टीचं ठाण मांडते ते कसंही पुरं करते . 'माझी सात्विक जिद्द' ही आठवण मनस्विनीला सात वर्षांनी मिळालेल्या शिक्षण-संधीची कहाणी आहे.

ती मूर्ती पूजक नाही. देवाच्या नावावर भंपक गोष्टी तिला पसंत नाहीत, तरीपण तिच्या आयुष्यात असं काही घडलं की ती त्याला नकळत योगायोग तर नाही? असं 'अनाकलनीय' आठवणीत म्हणते. अत्यंत सनातनी, शिस्तप्रिय घरांत ती लहानाची मोठी झालेली आहे. तरीही शाळेतील कुलाप्रमुखाची निवदडणुक नि प्रत्यक्ष आयुष्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचा तिने केलेला अव्हेर ती आपली पायरी ओळखून करते. तिच्या capacity चा तिला योग्या अंदाज आहे आणि ती सत्तेच्या मोहाला बळी पडत नाही. ही तिची वागाणूक जगाच्या दृष्टीने उद्धटपणाची असली तरी तिच्या भूमिकेतून आपण विचार कराल, तर तिचे पक्के विचार अमान्य करता येणार नाहीत.

तिच्या आयुष्यात 'बक्षीस समारंभ' आले. असे समारंभ हे अफाट मेहनतीचं फळ, परिश्रमाचे श्रेय असतं. राज्यात नंबर आल्यावर, तिच्या आई वडिलांनी बोलावणे असूनही, गैरहजेरी लावली याचे तिला आजही दु:ख आहे. यासाठी रडत न बसता पुढील जीवनात ती आपल्या मुलांच्या प्रत्येक बक्षीस समारंभात सामिल होते. समारंभ कुठेही असो, कितीही वाजले असोत, दोन दोन गाड्या बदलूनही ती त्या कार्यक्रमाला जाते, मनसोक्त टाळ्या वाजवून मागची कसर भरून काढते. आनंद लुटते. यातच सर्व काही येतं.

अशा आठवणी गप्पा टप्पा मारत तुम्ही मनस्विनी ला अधिक जवळून ओळखू लागाल

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386
Manaswini's quote of the day: जिद्द तारून नेते

Wednesday 3 June 2015

आठवणी १: पहिल्या पाच गोष्टी

नमस्कार! आजच्या ब्लॉग मध्ये आठवणी १ ते ५ बद्दल अधिक सांगते. आयुष्यात सर्व आठवणी दु:खामयी नसतात तर जास्त करून आनंदमयी असतात हा मनस्विनीचा अनुभव थेट आपल्या सारखाच आहे. या प्रवासात मिळणारे मनाचे हेलकावे अलौकिक वाटतात. लहानपण कितीही दु:ख आणि कष्टांनी माखलेलं असलं तरी आपण जस जसे मोठे होतो तसतसे त्यांतील सुखद भाग निवडून आपण त्याची सुंदर माळ बनवतो. बालपणाच्या memories अधिकाधिक refine होतात आणि अधिक जिवलग होतात.

प्रायमरी शाळेतील शिपाई (प्यून) सुद्धा आपल्या मनात घर करून बसतो. त्याच्या चिडवण्याला उत्तर न देऊ शकलेली मनस्विनी त्याला पट्टीने मारण्यास धावते. त्यात तिचा बालीशपणा आहे जो आजही अतिशय गोडव्याने तिच्या लिखाणात प्रस्तुत झालेला दिसतो. समाजातील स्त्री-पुरुष भेद तिला नेहमीच खटकतो. वीणा विराणी असो किंवा वीरेंद्र शहा असो, समाजरचनेच्या दोषाने त्यांना होणारा त्रास शारीरिक हानी नसून मानसिक हानी अधिक करतो. अशा वेळी खात्रीची, विश्वासाची व्यक्ती ही बहुतांशी प्रेमळ teacher असते. मुलं आणि त्यांचे पालक हे नातं जन्मसिद्ध असलं तरी जेव्हा त्यांच्या मतांत तफावत येते तेव्हा ती दूर करणारी व्यक्ती teacher च असते. या भूमिकेत मनस्विनी अनेकदा गेलेली दिसते.

'पहिल खोटं' या आठवणीत तिच्यावर घरातून असलेले संस्कार अप्रतिम प्रकारे मनस्विनीने दाखवले आहेत. खोटं बोलणं, चोरून करणं हे वाईटच. खोटं आज नाही उद्या, मग, नंतर कधीतरी, उघडं पडतं. स्वत:च्या मनाला खातं. आपली चैन सुख नष्ट करतं. म्हणून ही गोष्ट वाचली की या संस्काराचं महत्त्व आपल्यालाही पटेल. व्यवहारिक खोटं हे ही  खोटच जरी आज त्याला पुसट मान्यता समाज देतो! निष्कर्ष : या दुनियेत खरं पाहिलं तर खरं आणि खोटं काहीच नाही तर ते relative असतं आणि आपल्या आपल्या जागी योग्यच असतं.

समाजाच्या अदृष्य बंधनानं पालकांची होणारी कुचंबणा, मुलांची मानसिक हानी आणि त्यांच्या इच्छा आणि कुवतीचा ऱ्हास मनस्विनी 'किती अनैसर्गिक' या गोष्टीत व्यक्त करते. समाजानं आज या बंधनांतून बाहेर पाडायची वेळ आली आहे. मनस्विनीने सहज मांडलेले तिचे विचार आपल्या मनात दीर्घ काळ घर करतील अशी आशा करते. 
Manaswini's quote of the day: Truth is relative.

Tuesday 2 June 2015

आठवणी भाग १: Introduction


नमस्कार! आठवणी (लघुकथा) चार भागांत लिहायचं ठरवलं. आज पहिला भाग आपल्या हातांत देतांना मनस्विनीला अतिशय आनंद होतं आहे. 'अनुभूति' काव्य संग्रहानंतर इतक्या लवकर हे दुसरे ebook प्रसिद्ध करतांना मनाला एक वेगळेच समाधान मिळत आहे. पुढील भाग ही माझ्या हातून लवकर पूर्ण व्हावेत ही इच्छा!

आठवण १,,,४ सर्वच छोट्या छोट्या कथा आहेत. प्रत्येक कथा 'आठवणी'च्या रूपांत आहे. मनस्विनी प्रत्येक कथेतील मुख्य व्यक्ती (narrator) म्हणून 'मी'च्या भूमिकेत वावरते आणि वाचकांना गोड फ़सवते. वाचकाला हेच मनस्विनीचं खरं आयुष्य असावं असं वाटतं. प्रत्यक्षात 'मी' होण्याचं वैशिष्ट्य हाच या आठवणींचा केंद्रबिंदू आहे.

प्रायमरी शाळेतील प्युनपासून सुरुवात होणारी आठवण एका जबाबदार तरुणीच्या, व्यवहारी जगाच्या ओळखीपर्यंत अगदी अलगद, शांत नि सरळसोट मार्गाने पुढे सरकते. तरीही गोष्टींमध्ये link आहे. शिक्षिकेच्या भूमिकेतून ती विराणी, वीरेंद्र अशा मुला मुलींकडे बघते तर लग्नाच्या वाढलेल्या वयामुळे समाजातील अशा मुलींच्या अडचणी ती सांगते. समाज स्त्रियांकडे, विशेषत: समाज-चाकोरीपासून दूर गेलेल्या किंवा घालवल्या गेलेल्या मुला मुलींची भूमिका ती निभावते.

विविध नोकऱ्यातील ठिकाणांपासून व्यक्तीरेखांपर्यंतची शब्दचित्रे या संग्रहात दिसतात. साठ सत्तर वर्षांपूर्वीपासून आजपर्यंतचे विवध क्षेत्रांतील, अनेकविध गोष्टी ती 'मी' या व्यक्तिरेखेभोवती गुंफते. पूर्वीच्या सामाजिक कल्पना, त्याला अनुसरून असलेल्या रिती, मुलांकडे पहाण्याचा दृष्टीकोन, घराण्याची परंपरा आणि त्यांचा विपरीत परिणाम भोगणारी त्यांचीच मुलं पाहिली की आज हैराण व्ह्यायला होतं. आई वडीलांच्या संसाराला हातभार लावणं आणि त्यागीपाणाची मूर्ती असणं गृहीत धरलं जायचं. पण याबद्दल मतप्रदर्शन करून ती समाज कसा घडला एव्हढच सांगू शकते .

गणपती उत्सव, आंब्यांचं साम्राज्य, रोजची गोष्ट या कथा समाजातील चांगल्या वाईट प्रथा दाखवतात. एकत्र कुटुंबातील आत्या हे खास अधिकारी व्यक्तीचं चित्र रेखाटते. मुलींच्या शाळांतील प्रगती 'लेझीम स्पर्धा' मध्ये दाखवते. 'बक्षीस समारंभ' मध्ये श्रीमंत प्रसिद्ध बाप किंवा नवरा असणाऱ्या (backing वाल्या) मुलींना मिळणारी खास वागणुकीन वशिला नसलेल्या 'मी' वर होणाऱ्या अन्यायाची तिला चीड येते. ती जिद्दीने पदव्या तर मिळवते पण त्या पदव्यांचा तिला फायदा मिळतो कां? थोडक्यात योग्य वयात, ज्या त्या वेळेस, जे ते एखाद्याला मिळणं किती जरूर आहे, हे वंचित मनस्विनी सांगते.

स्त्रीजात पृथ्वीवर आली तेव्हा पासूनच अधिकार-कनक-कांता हेच समीकरण असण्याची मनस्विनीची मनोधारणा चूक वाटत नाही. पूर्वी हे होतं नि आजही आहे. फक्त expression च्या तऱ्हा वेगळ्या, भाषा वेगळी, प्रकार वेगळे. एव्हढेच!

Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386

 

Monday 1 June 2015

अनुभुति: इतर कविता


नमस्कार! आत्तापर्यंत अनुभूति संग्रहातील विविध categories मधील कवितांबद्दलचे ब्लॉग्स वाचलेत. पण मनस्विनीने अशाही काही काविता केल्या आहेत, ज्या साधाराण अनुभवांना वेगळ्या ढाच्यांत बसवतात.

वाढदिवसाचे 'अभिष्टचिंतन' हा आपल्या संसृतीचे एक अंग आहे. आजच्या इंग्रजलेल्या संस्कृतीत birthday हा केक, पार्टी नि गिफ्ट यांनाच महत्त्व देतो. पूर्वीप्रमाणे आई-वडिलांना, घरातील सर्व मोठ्यांना, वडीलधाऱ्यांना नमस्कार करून झाल्यावर, घरातील प्रत्येकजण त्यांच्यात्यांच्या पद्धतीनं birthday boy / girlचं कौतुक करत. कुणी उचलून घेई, कुणी मुका घेई, कुणी तोंड गोड करीत तर कुणी स्वतः बनवलेली वस्तू भेट देत असत. पहाटे आईने उटी लावून घातलेली अंघोळ, नवीन कपडे, गोड गोड आवडीचं जेवण, मित्र मैत्रिणींचा गराडा आणि आपल्या मनासारखं वागायची मुभा!

कितीही कौतुकानं मुलांना वाढवलं तरी आई-वडील व ती मुलं यांच्यात असणारं पिढीचं अंतर विसरता येत नाही. ती मोठी झाल्यावर त्यांची आवड, मित्र मैत्रिणींचा प्रभाव / अपेक्षा यामुळं ती कधी पठडी सोडून वागतात, बिघडतात! त्यांच्या कडून 'अक्षम्य चूक' होते, ती कवितेत पहा.

भावनाप्रधान मनस्विनी मनाच्या कोणत्या अवस्थेत गीत जन्मते हे, 'जन्मते गीत' कवितेत सांगते. हा नाविण्य पूर्ण विषय मनस्विनी अनोख्या प्रकारे हाताळते. 'नयना' ही कविता नेत्रांतील विविध भावना स्पष्ट करते. स्त्री व तिच्या भावना यांची सांगड घालते. 'एकाकी' आणि 'लहर'या दोन चिमुकल्या कविता वाचकावर खूप प्रभाव टाकतात. हे ती वाचकांच्या कुवतीवर सोडते. आपण काढाल तेव्हढे अर्थ त्यांत निघतील.

आयुष्यात सुख दु:ख हातात हात घालून चालतात (ह्याला काही अपवाद आहेत) दोन्ही प्रसंगी प्रत्येकाला असणारी मित्रंची जरुरी 'फ्रेंडकी जरूरत' कवितेत लिहिले आहे. परक्या घरातून आलेली 'स्नुषा' ही पोटच्या मुलापेक्षा ही अधिक आपुलकीने सासर आपलंसं करते. वृद्ध सासऱ्याची आपल्या वडिलांसारखी काळजी घेते व आधार देते. तेव्हा भारतीय संस्कृतीचा मनस्विनीला अभिमान वाटतो.

चिरतरूण मनस्विनी जेव्हा आजच्या तरुण मंडळींच्या संपर्कात येते, तेव्हा या तरुणांची दिशाभूल झालेली तिला आढळते. अडचणींचा सराव नसलेल्या पिढीला स्त्रीसुलभ पद्धीतीने बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. म्हणून वर्तमानात चिरतरुण अवस्थेत ती जगावे असे recommend करते.

या संग्रहाच्या शेवटच भजन सद्यस्थितीचे आहे. तिथे कंसात लिहिलेल्या शब्दांचा उच्चार घोगऱ्या आवाज काढला तर भजनाची मजा काही औरच येते. अगदी टाळ, झांजा, मृदुंग घेऊन भजनाच्याच चालीवर गाऊन बघा. मनस्विनीचं innovation एका नवीन प्रकाच्या पद्याचा अनुभव देईल. अनुभूति संग्रह वाचा आणि facebook वर जरूर कळवा.



  

Sunday 31 May 2015

अनुभूति: विडंबन आणि बाष्कळ गीतं


कोणतीही चांगली गोष्ट, कालांतराने कालबाह्य होते. त्यामधील दोष लक्षात येतात, त्यावर टीका ही होतेच. हसत हसत टीका करून आपण त्याची खिल्ली उवतो. काहीसा हाच प्रकार मनस्विनीच्या 'अवघे पाऊणशे वयमान' कवितेत दिसतो. आजची स्वतंत्र स्त्री, आपली हुशारी, चलाखी आणि तिला आलेली जागृती, अगदी हिरीरीने प्रदर्शित करण्याची एकही संधी फुकट घालवत नाही. ह्या कवितेतील नगरसेविकेचे वर्णन विडंबनात्मक आहे. नगराची सेवा सोडून इतर show off मध्ये ती मग्न आहे. नगरसेविकेच्या नातवाची reaction पहाण्यासारखी आहे.

शनीचा उपग्रह 'रिया' बराचसा पृथ्वी सारखा असल्याने, शास्त्रज्ञांनी भविष्यात पृथ्वीवरच्या मानवाला रहाण्या योग्य ग्रह सुचविला आहे. मनस्विनिच्या व्यंगात्मक कॉमेंट्स पहा, उलटा फिरणारा हा ग्रह जो ज्योतिष शास्त्रात त्रास्दायाक मानला जातो, त्यावर लोक असतील तर ते आमच्या लांचखोर राजकाराण्यांसाराखेच असणार. पृथ्वीवरील अशा लोकांना रिया ग्रहच योग्य असा वाचकांचा समज होईल पण मनस्विनी उलट सुचवते की लाचखोर लोकांचा रियावर कसा निभाव लागणार?

अत्यंत भावुक होऊन ती, 'आदर्श घोटाळा' करणारे अनेक लांचखोर अधिकारी आणि राजकारणी यांवर संतापते. खरा प्रश्र्न तिला पडला आहे, कर्तव्यबुद्धी नसलेली ही मंडळी, शहीद जवानांना दिखावटी सन्मान तर देतात पण अशा प्रसंगातही काळी कर्तुते करायला कचरत नाहीत. म्हणून त्यांची नसलेली इज्जत काढायाला ती मागेपुढे पहात नाही.

निव्वळ गम्मत म्हणून लिहिलेली 'बाष्कळ गीते' पण मनस्विनीचा खोडकर टीका करण्याचा माध्यम ठरतो. हसत हसत ती वर्मावर बोट ठेवते आणि वाचकाला बऱ्यांच वेळानी त्याचा अर्थबोध होतो. अनुभूति काव्यसंग्रहाचा शेवट करताना जे 'सद्यस्थिती' भजन ती गाते ते भजन नसून सद्यस्थितीचा उपहास आहे. वाचा आणि स्वतः आनंद लुटा!

Saturday 30 May 2015

अनुभूति : टीचरची भूमिका

मनस्विनी teacher म्हणून तिच्या जवळपासच्या समाजाकडे पहाते, तेव्हा त्या समाजाची वैशिष्ठ्ये व मुले वाढविण्याच्या त्यांच्या पद्धती पहाते. अबोध, निष्पाप मुले ही त्यांच्या पालकांचे प्रतिबिंब असतात. मुलांच्या खास गरजा तिच्या निरीक्षणात आल्या. या सर्वाचे हुबेहूब वर्णन या सत्यकथेवर आधारित कवितांमध्ये साफ दिसते.

मुंबईत व्यापारी वर्ग बराच मोठा आहे. त्यांचे फायद्याचे व्यवहार न कळत त्यांची मुले कशी आत्मसात करतात हे बघण्याजोगे आहे. 'अखेर व्यापारीच' असं आपणही म्हणाल. स्वतः च्या अधुपणान स्वतः च्या मुलांनाच त्रास देणाऱ्या व्यक्ति किंवा मनाविरुद्ध समाजाच्या बंधनाने चिडणारा बाप असो, 'हाच मुलाचा बाप' आणि 'असाही जन्मदाता' या कावितातांमध्ये भेटतो. 

टीचरच्या कडक पण प्रेमळ शिस्तीने समज आल्यावर सुधारलेले तिचे विद्यार्थी आपल्याला 'अशीही कृतज्ञता' किंवा 'स्वगत यशानंतर' येथे भेटतात. मनस्विनीला असं मिळालेलं प्रेम हीच तिची गुरुदक्षिणा ती मानते. सामाजिक प्रतिष्ठेपायी आपल्याच मुलांचं होणारं नुकसान 'चूक कुणाची भोग्तं कोण?' इथे जाणवते. त्यांच्या चुकीच्या धोरणांनी, कित्येकवेळा मुलं आपल्या आवडीचं करता (शिकता) येणार नाही म्हणून निराश होतात. कधी नशिबाचा फटका बसल्यानं निर्दोष मुलांना होणारी शिक्षा मनस्विनीला धक्का देते आणि तिच्या मनात 'असं कां?' हा प्रश्र्न उभा रहातो. 'गुड मेमरी'ही साधी कविता तर 'खुळ्या मुली' ही स्त्रीच्या आत्मकेंद्री असण्याच्या सवयीला चिमटा काढणारी कविता आहे. जुळ्या मुला-मुलींच्या जन्मतः गरजा आणि सवयी 'माझे शोधन' मध्ये ती नमूद करते.  

मुलांची मोकळी मने नि जगातील अलिखित पद्धती 'रीत ही जगाची' मध्ये आपल्या पुढे येतात. स्त्रिविवाह किंवा विवाह उशिरा होण्यानं तिची होणारी कुचंबणा येथे मनस्विनीने प्रकर्षाने मांडली आहे. समाजाच्या रीती कश्या आडव्या येतात याचे उदाहरण 'रमा कुंभार' आहे. काही लोकं स्व-खेरीज कशाचाही विचार करत नाहीत हे पाहिल्यावर मनस्विनीच्या मनात हे लोकं 'स्वार्थी की अडाणी' असा प्रश्र्न उभा रहातो. तरीही तिचे निरीक्षण सतत चालू आहे. तिने काढलेले निष्कर्ष तिची विचार समर्थता दाखवते.

सामाजिक रूढी, रिती रिवाज, समज आणि त्यांचे विपरीत परिणाम झालेले आपल्याला दिसतात. ती चूक नजरेस येताच ती त्वरित सुधारावी म्हणजे अनर्थ टळतो अशी शिकवण मनस्विनी देते. नुसती बडबड करून, टीका करुन मनस्विनी स्वतः काय करते असा प्रश्र्न कदाचित आपल्याला पडेल. शक्य तेव्हा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये समजौता घडवून आणून प्रश्र्न मार्गस्थ करते, दोन्ही पक्षांना emotional support पुरवते.

या कविता अनुभूति काव्य संग्रहात वाचा आणि मुलांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्यात तर या कविता लिहिणे सार्थकी लागले असे मला वाटेल. Facebookवर तुमचे अनुभव / मतं लिहायला कचरू नका, सर्वांना उपयोगी पडतील.



 

Friday 29 May 2015

अनुभूति: मी feeling बद्दल


मनस्विनी ज्या प्रसंगाचा, व्यक्तीचा विचार करते त्यांत ती स्वतः ला डूम्बवते ही तिची समर्थता, विशेषता. वाचकांना तो तिच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग भासतो. 'मी' भोवती फिरणाऱ्या तिच्या कविता 'मी हसले', 'अविस्मरणीय', 'भित्री' . स्वतः बद्दलचे, स्वतःशीच केलेले dialogues आहेत. हंसरी माणसं सर्वांनाच आवडतात. गंभीर स्वभावांच्या लोकांना दूर ठेवलं जातं. मनस्विनीला या गाम्भिर्यातही सौंदर्य दिसतं.

कोणती ही जबाबदारी म्हटलं की जोखीम आलीच. त्यासाठी स्वतःच्या मनाची घडण कशी करायला पाहिजे, हे ती सांगते. आईची जबाबदारी आणि महत्त्व तिच्या तोंडून निघते. 'मी' आणि 'ऋणानुबंध' हे न उकलणार कोडं (प्रेम) तिला विचार करायला लावतं. इथे वाचक बुचकळ्यात पडतो. 'स्वप्नातील स्वप्न'ची उकल ती फारच वेगळ्या गोष्टीने करते तेव्हा मजा वाटते. 'शेतकरी' आणि 'शेतकरी मी' किंवा 'गुंता विचारांचा' आणि 'क्षणिक जीवन जगायला' या कवितांत सत्याची उकल आहे. खरोखरीचा सूक्ष्म विचार केला तर आपल्या मनाचीही उलाघाल मनस्विनीच्या मनाच्या उलाघालीपेक्षा वेगळी होत नाही. एवढी ती मनःपूर्वक रंगवते आणि सत्य सहज समजते.

ती एक स्त्रीच आहे. भावना तिच्या जीवनाचा आधार आहे. 'ध्यास माझ्या मना' या कवितेत हे दिसते. तिला वेदना होतात, त्या न समजलेल्या प्रेमाच्या भावनांच्या! या कवितेत ती प्रेमाची व्याख्या करते, सार सांगते आणि मार्गही दाखवते. तिला आकलन झालेले जगातील सत्य सांगताना ती स्वतः ला समजावते की पुन्हा उभारी धर, प्रेम गवसेल. ते अमीट आहे.

स्वप्न ही खरं तर सामान्य गोष्ट. बहुतेकांना त्याचा अनुभव आहे पण मनस्विनीला नाही. तो मिळावा ही तिची साधी आशा पण ती पुरी झाली नाही म्हणून ती रडत नाही तर न पडलेल्या स्वप्नांचं नातं स्वतःच्या यशाला देते. किती वेगळी कल्पना?

तरुण वयात अनेकांच्या सुवर्णसंध्या विनाकारण हुकतात. अशीच हुकलेली संधी अचानक तिला मिळते. 'स्थलांतर' या कवितेत तिचा आशावाद व हुरूप आपण कवितेतच वाचा. वृद्धावस्थेकडे झुकून 'देई रे विसावा' असे सृष्टीकार्त्याला विनवते त्यावेळी तिला 'संभ्रम' पडतो यात ती चमचमती दुनिया, चमकणारे तारे आणि तरुणांच्या झालेल्या गैर समजुती यांची सांगड घालते आणि अधिकार वाणीने म्हणते सन्मान मागून मिळत नाही कर्तृत्व ते खेचून आणतं.

या सर्व कवितांमधील आत्मीयता वाचकाला वेगळ्या स्थरावर नेवून ठेवते. मी feeling हा जणू या कविता संग्रहाचा आत्माच आहे. self discoveryच्या तुमच्या प्रवासात मनस्विनीला तुमची जोडीदार करा आणि 'अनुभूति' संग्रह जरूर वाचा.


 

Thursday 28 May 2015

अनुभूति: पर्यावरण special



पर्यावरण आणि मानसिकतायांचा निगडीत संबंध अअहे. यांत्रिकीकरण आणि सामग्रीची प्रचंड मागणी हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. विज्ञानाने जसे मानवतेचे कल्याण केले तशीच त्याची हाव ही वाढवली आहे. आज प्रदूषण सर्वत्र आहे. प्रदूषण विज्ञानाने नव्हे तर माणसाच्या लोभीपणामुळे आहे, प्रक्रिया पूर्णपणे पार पाडून जर waste disposal नीट केले तर प्रदूषण कसे होईल? ही प्रक्रिया खर्चाची आहे आणि भांडवलशाही मनोवृत्तीत पर्यावरणाची उपेक्षाच होते. लाचखोर राजकारणी, अधिकारी व लोभी कारखानदार याला हातभार लावतात. प्रत्येकाचा स्वार्थ त्यांत दडलेला आहे आणि दिवसेन दिवस पर्यावरणाला तडाखे बसत आहेत.

ऑटोमोबाईलचा धूर, हवा प्रदूषित करते तर रसायनी कचरा पाणी दुषित करतो. जळणासाठी व कागद बनवण्यासाठी झाडे कापून वनाची, वन्य प्राण्यांची खच्ची होते. पृथ्वीचे संतुलन बिघडते. खनिज द्रव्व्ये व कोळश्याच्या अधिक वापराने जमिनीची धूप तर होतेच पण तापमान देखील वाढते. त्याकारणी हिम वितळून समुद्राची पातळी वाढतेय. भूकंपांचे प्रमाण आणि त्सुनामीची तीव्रता वाढली आहे.

प्रदूषित वातावरणात मनेही प्रदूषित होतात. मोहाला आवर न घालणं, बेफान वागणं, कशाचीच रया न ठेवणं ई. 'राजकारणी व्यापार' करणारा politician, पर्यावाराचा खरा दुश्मन आणि त्यावर मनस्विनी टीका करते. त्सुनामी आल्यावर तिच्या मनावर भारी परिणाम झाला आणि ती त्याचा उल्लेख 'तुझी अवकात' कवितेत करते. हिमालयाकडे गंगा वाहू शकते कां? पण उपहासाने मनस्विनी म्हणते की असंतुलित पर्यावरणाचा परिणाम झालेल्या स्थितित हे कदाचित शक्य होऊ शकेल.

जन्मदात्याला ती बालीश प्रश्र्न विचारते - अनंतातील हालचाली, satellite नं दाखवलेली चिखलातील खेडी, अंतराळातील कचरा, जो पृथ्वीला धडकणार होता, तिचा नाश करू इच्छित होता या सर्व गोष्टी तू का करत आहेस? माणसाने विविध प्रकारे तुझ्या राज्यात घुसखोरी केल्यानं तू रागावला आहेस का? शेवटी रागावलेल्या पित्याची बालकाप्रमाणेच क्षमा मागते आणि राग सोडायला सांगते. या कावितांद्वारे ती पर्यावरणाचा नाश न व्हावा म्हणून विविध भूमिकेतून आपले विचार सादर करते आणि जनजागृती करते.


 

Wednesday 27 May 2015

अनुभूति: चेतावणी / सावधानता


अध्यात्मिक परंपरेचा भारत हा शांतताप्रिय देश आहे. आक्रमण करणं हा इथल्या लोकांचा स्वभावच नाही. सरळ, साध्या माणसांचा देश निसर्गाने परिपूर्ण आहे. पण साडे-पांचशें वर्षांच्या गुलामगिरीचे दुष्परिणाम आजही या भूमीत दिसतात. निव्वळ 'अनुकरण' हा त्याचाच परिणाम आहे. कोणत्याही गोष्टीचे मूळ काय? ते आपल्याला कितपत उपयोगी आहे, याचा विचार न करता दुसऱ्याची हुबेहूब नक्कल करणं फार भारी पडतं. परकीयांचा प्रभाव येणं स्वाभाविक असलं तरी अंध, बेशिस्त अनुकरण घातक ठरतं. त्यामुळे अर्धवट रिती रिवाज, कल्पना, खाद्य, कपडे वापरणं किती योग्य आहे असा प्रश्र्न मनस्विनी विचारते. पारंपारिक सद्यस्थिती आणि foreign विचारधारा यांच्या मिश्रणाने समाज रचनेत मोठ्ठा स्फोट होऊ शकतो. तो टाळण्याची सावधानता बाळगणे जरुरीचे आहे.

आज मुली खूप शिकत आहेत, ज्ञानाच्या या उघडलेल्या कवाडांनं तिनं जिद्दीनं पुढे जायला हवं पण त्यात अतिरेक नको. हे मत ती 'सावधान पुरन्ध्रींनो' कवितेत स्पष्ट करते. न जुमानण्याच्या परिणामाची आठवण करण्यास कचरत नाही. कशाच, किती आणि कसं अनुकरण करायचं हे ज्यानी त्यानी ठरवायचं आहे त्यासाठी मुलं लहान असल्यापासून त्यांच्यावर भारतीय संस्कार असणं जरुरी आहे. तिथेच पालकांची खरी जबाबदारी वाढते. कच्चे संस्कार कठीण प्रसंगात ढासळतात आणि माणूस डगमगतो. कोणते ही चांगले काम तडीस नेण्यास बराच काळ नि कष्ट खर्चावे लागतात. insant results संस्कृतीत लोक short cut घेतात आणि पस्तावतात. 'संस्कार कश्याला हवेत' या कवितेत हेच ज्ञान संपादन करायला पक्के संस्कार लहानपणीच व्हायला हवेत हे ती आवर्जून सांगते.

आयुष्यात खोटं बोलणं / खोटं वागणं खूप सोपं आहे पण ते अर्ध्या घटके पुरतं यश देतं. खऱ्याचा मार्ग बिकट /खडतर तरी प्रदीर्घ काळ यश देणारा, शाश्वत आणि त्रिकाळाबाधित आहे. त्यासाठी संस्कार जरूरीचे आहेत आणि ते घरातच होतात. शिस्त ही वैयक्तिक आहे. ही सुधारणा व्यक्तीव्यक्तीत झाली पाहिजे कारण शिस्त व्यक्ती, कुटुंब, समाज मग देश या टप्याटप्याने होते म्हणजे मग देशात परिवर्तन येईल. हेच सूत्र पकडून मनस्विनी संपूर्ण संग्रहात वेगवेगळ्या पायऱ्यांवर सावधानता / चेतावणी देते. कान उघाडणीचे तिचे प्रकार कधी तीव्र आलोचना तर कधी शहाण्याला शब्दाचा मार या पद्धतीचे आहेत.

आज जे 'वास्तव' समोर दिसतं त्यावर मनस्विनीचा विचार वेगळा आहे. आपल्यावर जर कोणी अन्याय केला तर प्रतिकार करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार ती अधिक करते. नियतीच्या अन्यायाला शांत बुद्धीने, धीटपणे सामोरं जायला सांगते. त्यावेळी पाळायचे नियम सांगते, आणि परिणाम सांगते. इथे तिची स्थितप्रज्ञ अवस्थेकडे वाटचाल दिसते. असत्यापुढे नांगी टाकू नका ही चेतावणी ती देऊ पहाते.

मनस्विनी याच जगात रहाते त्यामुळे बदलती समाजाची चित्रे पहाते. कमकुवत भारतीय मनांवर परकीयांचा झालेला परिणाम तिला खटकतो. गुलामगिरी सदृश भासणाऱ्या मनोवृत्तीवर 'इंग्रचीचा पगडा' कवितेत हातोडाच मारते. म्हणजेच आजच्या मुला मुलींची वर्तणूक, फाजील आत्मविश्वास, कुणालाच न जुमानण्याची वृत्ती, तुटक नाते संबंध (आजा-आजी, आई-वडील, बहीण-भावंडे) याचे मूळ, विचाररहित अनुकरण आहे. आजची पिढी स्वातंत्र्यात जन्म घेतलेल्या भाग्यवान मुला मुलींची आहे. ती आता तरुण वयात आली आहे त्यामुळे त्यांनी या कवितेतील मुद्यांचा विचार करावा व सावधानता बाळगावी ही चेतावणी मनस्विनी मनापासून देते.

संपूर्ण देशाच्या स्थरावर पाहिलं तर अयोग्य राजकीय धोरणांनी व निव्वळ (परदेशीय) अनुकरणाने पर्यावरणाची हानी झाली आहे. पर्यावरणाच्या विषयी पुढच्या ब्लॉग मध्ये लिहिते. तोवर अनुभूति संग्रह वाचा आणि facebook वर कॉमेंट्स लिहा.

Facebook page:  www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869



Tuesday 26 May 2015

अनुभूति: बोध


मनस्विनीच्या विचारात नि कल्पनाशक्तीत विविधता तर दिसतेच, त्याखेरीज 'अजून काहीतरी' जाणवतं. जगाच्या बऱ्या-वाईट अनुभवातून काहीतारी बोध ती आपल्याला घ्यायला सांगते . पुन्हा पुन्हा त्या शक्तीला, की जी आपल्या आयुष्याचा मोठा भाग आहे, त्याला विसरू नका. वळणावळणाने, अनेक कवितेतून, अनेक प्रकारानं ती आपल्या आत्म्याची उन्नती, प्रगती, मुक्ती करण्याच्या ध्येयाची आठवण देते. कधी आई, कधी मैत्रिण तर कधी teacher बनून ती आपली भूमिका निभावताना दिसते.

'आत्म्याचे स्वगत' या कवितेत भूतलावर तिला दिसलेले मार्ग ती सांगते आणि योग्य मार्गानेच तू जा असे सुचवते. माणसाने केलेली हुशारी ती नमूद करते आणि शेवटी व्यवहारी जगाची रीत दाखवून, निर्गुण निराकाराला न विसरण्याचा सल्ला देते - तुम्हा आम्हाला नाही, स्वतःच्या आत्म्याला! अनेक वेळा आपल्या शब्दांचा अनर्थ होत असतो. लहान मुलं तर या बाबतीत कोवळीच आहेत. आई का रागावली हे न कळणाऱ्या छोट्याश्या मुलाला ती समजावते, एवढेच नाही, तू कुठे चुकतो आहेस हे कल्पक गोष्टीतून त्याला युक्तीने सांगते, 'अर्थ लावू या शब्दांचा' या कविते द्वारे.

'भाग्यवान' कुणाला म्हणायचा यासाठी ती स्वतःच्या लहानपणीची आठवण सांगून, आज भाग्यवान कुणाला म्हणायचं याचं विश्लेषण करते. भारतीय संस्कृती, आदर - मग तो विद्येचा असो, अनुभवी व्यक्तींचा असो, वृद्धांचा असो - करायला सांगते / शिकवते. दोन माणसं एकत्र आली की वाद-विवाद, भांडणं हे गृहीतच आहे, याचं प्रतिबिंब म्हणजे 'छत्तीस नको त्रेशष्ठ हवे' आहे. वडीलधाऱ्यांनी आपल्या मुला मुलींशी कसं वागायला हवं, मार्गदर्शन करायला हवं आणि तरीही त्यांचा आत्मसन्मान न दुखावता! कारण, हे नातं पूर्व जन्मीचं असलं तरी या जन्मी पृथ्वीवर प्रत्यक्षात येणारं आणि नितळ प्रेमाचं आहे, हे ती मानते.

माणसाला 'मर्यादा' आहे, ती त्याने ओलांडायची नाही कारण ती विश्वचालकाच्या व्यवस्थापनाखाली आहे. याच जाणीवेतून श्रद्धा निर्माण होते आणि अज्ञानाने अंधश्रद्धेत रूपांतरित व्हायला वेळ लागत नाही. हे मनस्विनी 'नको अंधश्रद्धा' कवितेत सांगते. माणसाला होणारा मोह, त्याचे संस्कार धुवून टाकतात हे 'मोह की संस्कार' या कवितेत आपणच वाचा. मोह हा वैयक्तिक आहे. त्यातूनच चांगल्या चांगल्या गोष्टींचे कसे 'तुकडे तुकडे' उडतात या कवितारूपाने मनस्विनी एक बोध देण्याचा प्रयत्न करते.

कोणत्याही चांगल्या कामाचे / कर्माचे फळ उत्तमच असते. याची जाहिरात न करता ही नियती त्याची नोंद करत असते व त्याचे फळ न सांगता तुमच्यापर्यंत पोहोचवते. समाजात अनेकदा येणारा अनुभव असा आहे की तुमच्याजवळ जे नाही तेच नेमके समाजाला हवे असते. म्हणून 'प्रयत्न का वृथा?' असे मनस्विनी विचारते. प्रत्येक जीव वेगवेगळ्या कार्यासाठी, त्याच्या कर्मानुसार जन्माला येतो असे संस्कृती मानते, मनस्विनी जाणते. एका वेगळ्याच गणिती पद्धतीने तिने 'समाजाचे गणित' मांडून ते सोडवले आहे. समाजाचे सर्वमान्य नियम पाळण्याचा बोध तिने दिला आहे.

अति गर्व करणाऱ्या स्वतःला अत्यंत शहाणी समजणाऱ्या वृद्धेला एक 'मच्छर' कसा धडा शिकवतो. किरकोळ शत्रूला ही दुर्लक्ष्यू नका हा मनस्विनी बोध देते.

व्यक्तिव्यक्तीची 'मानसिकता' अलग अलग आहे. समाजानं कितीही प्रयत्न केला तरी ती बदलणं अवघड आहे हे तिला जाणवतं. मुला मुलींच्यातील केलेला फरक हे याचेच एक उदाहरण आहे. कोणत्याही ग्रंथाचे किंवा गोष्टींचे नुसतेच वाचन नसावे हे 'नको पारायणे व्यर्थ' या कवितेत दिसते. प्रयत्नपूर्वक केलेलं कोणतं ही काम आपल्याला चांगलच देऊन जातं, यावर मनस्विनीचा दांडगा विश्वास आहे. घंटा वाजवत, देवळांना भेटी देत, यात्रा करत फिरण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपलं विहित कर्म मनापासून करण्याचा बोध तिनं घेतला आहे.

फार पूर्वेकडील त्सुनामीन घातलेला गोंधळ तिनं पाहिल्यावर, निसर्ग हाच खरा मोठ्ठा शिक्षक आहे याची तिला खात्री झाली. तिच्या मनावर खोल कुठेतरी याचा आघात झाला. तिच्या मनावर दडपण आलं. माणसानं कितीही हुशारी केली तरी त्याची 'अवकात' किती हे तिच्या लक्षांत आलं. आपल्याला निर्माण करणारी शक्ती (परमेश्र्वर) किती श्रेष्ठ आहे हे ती अनुभवते. येथल्या प्रत्येकाच्या मूळांचं गूढ तिला सुटत नाही म्हणून ती 'त्या' शक्तीला प्रणाम करते.

'अनुभूति' मधील विविध कवितेतून काहीना काही बोध मिळतो. त्या बोधाचा आपणही विचार कराल असा तिचा विश्वास आहे. तर चला वाचू अनुभूति - एक आगळा कविता संग्रह. Facebook वर कॉमेंट्स जरूर लिहा.