Friday, 22 May 2015

अनुभूति: Feelings बद्दल


'अनुभूति' काव्य संग्रहात मनस्विनीचे विविध मूड जाणवतात. प्राण्यांना भावना असतात आणि माणूस तर प्रगल्भ बुद्धीचा, संस्कारीत जीव. मग त्याची भावना ही अधिक तीव्र, अधिक सूक्ष्म असणं स्वाभाविक आहे. त्याला भाषा आहे, त्याला लिहिता वाचता येतं आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर तो भराऱ्या मारतो. त्यांच्याद्वारे तो भावना रंगवतो, खुलवतो. सृष्टीतील गोष्टी तो आपल्या भावनांशी जोडतो, त्यांतील साम्य, तफावत आणि विसंगती तो शोधू शकतो. कविता कथा लिहू शकतो. मनस्विनिच्या भावनाही निसर्गाशी आगदी निगडीत आहेत. निसर्गात पडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बर्फाचे नि तेव्हाच्या निसर्गाचे वर्णन यांची तुलना आपल्या वृद्धावस्थेशी करते. त्याद्वारे ती वाचकांना आपली मने चिरतरुण ठेवायला सांगते.

प्रयत्नपूर्वक आपली इच्छा पूर्ण झाल्यावार तिला 'मुक्ती' मिळाल्यासारखं वाटतं, ती आनंदी होते. मनस्विनीच्या कवितांत कित्येक भावनांच्या लहरी तरळतात. मुक्ती सर्वोच्य पण त्याआधी समाधान, स्नेह, कृतज्ञता, परोपकार, अनुकंपा, राग, आलोचना, तिरस्कार, भय आदि भावना ती अनुभवते.

लहानपणीच्या आपल्या कल्पना ह्या कल्पनाच असतात. जरा वय वाढल्यावर, दुनियेचे खरे रूप समजू लागल्यावर काही कल्पना चूक असल्याची 'अनुभूति' तिला होते. Reality आणि आपली कल्पना ह्यांतील तफावतीत भावनांचा उगम होतो. पुढे परिस्थिती आणि वातावरणाने ह्या भावना बदलत रहातात आणि मनस्विनी परिपक्व होत जाते. गम्मत पहा, ती nature जाणते आणि मग निसर्ग तिला अधिक कल्पना देतो. तिचा सर्वांगीण विकास होतो. बालपणातील चुकाही तिला कळतात त्यामुळे ती अचानक गंभीर होते. आपल्या जीवनातील चुका प्रत्येकाने दुरुस्त केल्या पाहिजेत अस तिला वाटतं,'टारगट' कविता याचेच प्रतिक आहे. जाता येता तिचे निरीक्षण असं सुचवतं की चालू घडिला समाजात असणाऱ्या प्रथा किंवा न मिळणारं व्यवहाराचं शिक्षण हे घातक आहे. या बद्दल ती कडक आणि बिनधास्त बोलते. Corrupt झालेल्या सामाजिक प्रथांचा तिला राग आहे हे तिच्या 'विदारक' 'परीक्षा' कवितांत स्पष्ट जाणवते. सासर माहेर यांचं जेष्ठ कनिष्ठ नातं का केलं जातं याचं उत्तर ती शोधते आणि दोन्हीकडची नाती स्वत:च्या वाढीसाठी किती निगडीत आहेत हेही तिला पटते. तरीही प्रत्येक नात्यानं आपली मर्यादा ओलांडायची नसते हे ही तिला जाणवते.

मनस्विनिच्या सर्वच कवितेत तिचे deep feelings दिसतात पण काही कविता feelings बद्दलच आहेत. त्या वाचताना तिच्या खऱ्या स्वभावाचे दर्शन होते. मुळात भावनाप्रधान असलेली मनस्विनी कर्तव्यपूर्तीसाठी कशी कणखर होत जाते हे वाचकांना जाणवेल.

'अनुभूति' तील कविता जरूर वाचा, विविध भावनांचा आस्वाद घ्या आणि facebook वर कॉमेंट्स टाकायला विसरू नका!

 


Wednesday, 20 May 2015

अनुभूति: पार्श्र्वभूमी


नमस्कार! आज मी माझ्या पहिल्या ई बुकच्या बद्दल थोडसं लिहिते. म्हणजेच मनस्विनीच्या 'अनुभूति' कविता संग्रहाबद्दल… प्रत्येक व्यक्तिला कधी ना कधी या अनुभूतीचा अनुभव येतच असतो, मग मनस्विनीच्या अनुभूतीच वेगळेपण काय? नि कसं?
ही परिपक्व स्त्री चांगल्या घराण्यातील आहे. तिने समाजातील अनेक व्यक्ती अगदी जवळून न्याहाळल्या आहेत. त्यांची जीवनशैली, सुख दु:ख ती पूर्णपणे जाणते. इतकेच नाही तर ती दु:खे, कुचंबणा आपलीच आहेत असे मानते. त्या वेदना ती अनुभवते. या एकरूप होण्यामुळे अनुभूति मधील प्रत्येक कविता स्वानुभवाच्या अनुभूतीतून लिहिलेल्या दिसतात.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर 'जनतेसाठी राज्य' ही कल्पना रुजली. सर्वांना सर्व हक्कानं मिळाव ही त्यामागची भावना. त्यामुळे संपूर्ण समाजरचना ढवळून निघाली. त्याचे चांगले वाईट परिणाम समाजात उमटले. कर्तव्यापेक्षाही माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव अधिक प्रकर्षाने झाली. कोंडलेली स्त्री जागी झाली, खडबडून उठली. समाजरचनेत त्यांची केली गेलेली कोंडी, त्याचे दुष्परिणाम ती भोगत होती. मध्यमवर्गीय स्त्री या सर्वाचा मोठ्ठा बळी ठरली. कुटुंबातील तिचे दुय्यम स्थान, कर्तृत्वाला नसलेला वाव, शिक्षणाचा अभाव, विधवांना मिळणारा 'आश्रित' हा दर्ज्या ई. एक नाही अनेक अडचणीत ही स्त्री डुम्बली होती. आजच्या नव्या पिढीला याची अंधुकच कल्पना आहे. स्वातंत्र्यात जन्मलेली आजची स्त्री सर्वार्थानं 'पुढे' गेलेली दिसते. या सर्व बदलांची साक्षीदार मनस्विनी आहे. पिळवटून निघालेली मनस्विनी याच भावना, वेदना आपल्या कवितेत रंगवते. वेग वेगळ्या समाजातील मुली, स्त्रिया कश्या वेग वेगळ्या दडपणात आहेत, याच निरीक्षण तिनं केलाय. आजची स्त्री कुठे चुकत आहे किंवा तिची प्रतिक्रिया disproportionate असू नये हे ती स्पष्ट शब्दात लिहितेय आणि त्यांना सावध करतीये. यासाठी तिने अनेक व्यक्ती आणि प्रसंगांचे शब्दचित्र काव्यात गुंफल आहे. या स्त्रियांच्या मनात जावून आपणच ते भोग भोगले आहेत अशा direct पद्धतीने तिने कविता सादर केल्या आहेत. कधी कधी तिचा मूड विडंबनान आपलं म्हणणं पटविण्याचा आहे, कधी कधी ती बाष्कळपणे सत्याची 'अनुभुति' देते. खालावत चाललेला समाज, गमावत चाललेली नीती मूल्येही ती टिपते. पर्यावरणाची काळजी तिला वाटते, तर कधी आपल्या आत्म्याशीच ती बोलते. अनेक प्रश्र्न तिच्या मनात येतात, त्यांची उत्तरे ती शोधण्याचा प्रयत्न करते. तिला जे समजलं आहे त्यातून ती नवीन पिढीला बोध घ्यायला सांगते. बालगोपालांशी ती एकरूप होते, आनंदी होते. मनस्विनी एक आई आणि उत्तम शिक्षिका असल्याने, मागच्या पिढ्यांची 'ठेव' ती जाणते आणि त्यात स्वत:ची भर घालण्याचा हा तिचा प्रयास आहे. कवितांच्या विविध प्रकारातून तिला खूप खूप सांगायच आहे. ती तत्ववेत्ती नाही तरी एक चांगली व्यक्ती आहे, हे वाचकांना जाणवते. तर्कशास्त्र, विज्ञानाकडे फिरवलेली पाठ असा समाज तिच्या नजरेला खुपतो. अंधश्रद्धेवर ती प्रहार करते पण श्रद्धाळू भारतीय समाजाचे वर्णन ती शेवटच्या भजनात करताना कचरत नाही.

मनस्विनी ज्या समाजात जन्मली, वाढली, त्या समाजातील कमतरता तिच्या काव्यात दिसते. बऱ्याच अनुभवांची गाठोडी तिच्या जवळ जमली, ती अस्वस्थ झाली नि तिच्या संवेदनाशील मनावर दडपण आलं. स्वतःला relax करण्या साठी लिहिलेल्या ह्या कविता तुम्हाला स्पर्श करतील. पुढील ब्लॉग्स मध्ये तिच्या कवितांच्या प्रकारांबद्दल विस्तारित लिहीन. तोवर अनुभूति कविता संग्रह जरूर वाचा आणि facebook वर कॉमेंट्स करा.




Tuesday, 19 May 2015

Namaskar vaachakaanno!

नमस्कार! रसिक वाचकांनो - नमस्कार!

एखाद्या आळीन सुंदर फुलपाखाराच रूप घ्यावं - आपल्या कोशातून बाहेर पडावं - आणि झूSSS वेलींवर उडावं - तशीच मी मनस्विनी खूप खूप वर्षांनी आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. एक नवा उत्साह, एक नवा जोश घेऊन! प्रत्येकाच आयुष्य ही एक नवी 'कहाणी' असते. ती कहाणी कधी सुखाची, कधी दु:खाची पण जास्त करून सुख आणि दु:खाचं बेमालूम मिश्रण असतं. वजनाचा काटा जसा १ ग्राम वजनानं ही वर-खाली होतोनां तसं! पण मला मात्र आयुष्य सुंदर वाटतं. या झोक्यावर हिंदोळे घेताना मला गाणं म्हणावसं वाटतं. हे मात्र खरं की ते गाणं कधी प्रेमगीत, आनंदगीत, सुखदगीत, यातनागीत, वेदनागीत तर कधी बालगीतही असू शकतं! माझ्या आवाजाची 'प्रत' महत्त्वाची नाही तर त्यांतील भावना विणणारे शब्द अधिक महत्त्वाचे असतात असं म्हणानां! शब्द भावना व्यक्त करतात बस्सSS
 
मनस्विनीची रचना हे ह्याचेच उदाहरण आहे. लहानपणीची,तरुण,प्रौढ किंवा उतारवयाची मनस्विनी आपले विविध क्षेत्रातील अनुभव आणि त्यांतून तिला झालेली जाणिव, ज्ञान, शहाणपण यापेक्षाही जीवनाचा अर्थ ती जाणू लागली. याच आनंदानं तिला काव्य सुचलं. ती लिहू लागली. तो आनंद तिनं शब्द रुपानं आपल्या सर्वांना वाटण्यासाठी पाठवला आहे. आपण जेव्हढे मनस्विनीशी एकरूप व्हाल, तिला अधिक जवळून पहाल, तितके तिला अधिक ओळखू शकाल. तिचे गुण (आणि दोषही) आपल्याला जाणवतील. त्याची जाण आपण माझ्या फेसबुकवर कमेंट्सच्या रूपानं द्या. माझा आनंद द्विगुणित होईल!
 
पुनर्भेटीत आनंद तर आहेच पण त्याहूनही अधिक आनंद आपण केलेल्या चांगल्या वाईट टीकेत उत्तम interaction होईल. मी बोलतीये आणि तुम्ही ऐकताय ही कल्पना न रहाता, वस्तुस्थिती होईल! म्हणजे - नव्या कल्पना, नवी वस्तुस्थिती आणि 'अनुभूतीचा' ठेवा यांचा त्रिवेणी संगम! पावित्र्याच प्रतिक!! एक नवीन संधी यांतून जुनी मूल्य - नवीन विचारधारा असे चित्र उभे होईल. शक्य होईल तितके ब्लोग्स मी येथे लिहिणार आहे. सुरुवात अनुभूती संग्रहातील काही निवडक कवितांच्या अवलोकानाने करते. कवितांची पार्श्र्वभूमी तसेच त्यांचे बदलते अर्थ अधिक स्पष्ट होतील. यासाठी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत लिहित जाण्याचे मनोगत आहे. माझ्या ब्लोगवर आपली भेट होतच राहील...


Purchase Anubhuti at: www.smashwords.com/books/view/543035
Facebook page: www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869